निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली शंभर कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून सरकारनं चक्रीवादळग्रस्तांसाठी संपूर्ण आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते.

राज्यात गेल्या वर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत माझ्या सरकारनं, सातारा-सांगली-कोल्हापूर साठी चार हजार सातशे आठ कोटी रुपये, तर नाशिक आणि कोकण साठी 2 हजार 108 रुपयांची मदत केली होती, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. 75 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज उभारण्याची परवानगी, केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिली असून कर्जाच्या माध्यमातून निधी उभारून, राज्य सरकारनं जनतेला मदत करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.


 


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image