‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात


मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात जीवित व वित्त हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे चक्रीवादळ नैसर्गिक आपत्ती असून त्यामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हास्तरावर सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.


या चक्रीवादळामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले असल्यास अशा नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी प्रकरणी बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा सविस्तर प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत शासनास पाठवण्यात यावा, असे आदेश देण्यात आल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image