कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे


नवी दिल्ली : कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. विविध राज्यांमधे कोविड रुग्णांची आणि मृतदेहांची आबाळ होत असल्याबद्दल स्वतःहून दखल घेत न्यायालयाने केंद्रासह दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आणि तमिळनाडू या राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत.


मृतदेहांची स्थिती भयावह असून, केंद्र सरकारनं त्याविषयी जारी केलेल्या सूचनांचे पालन झाले की नाही, अशी विचारणा न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. दिल्लीच्या रुग्णालयांमधे कोविडने मृत्यू पावलेल्यांचे मृतदेह एकावर एक ठेवल्याचे आढळले होते. तर अनेक ठिकाणी रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात आले होते. अनेक ठिकाणी मृतदेहांची हेळसांड होत असल्याची दखल घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाकडे त्याची सुनावणी सोपवली आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image