मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवण्याची गरज - अशोक चव्हाण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून काहीही निष्पन्न होणार नाही, असं मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ज्या ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत, त्यांनी तिथेच आवाज उठवला तर फायदा होईल, सर्वांनी कायदेशीर लढाई लढली पाहिजे, असं ते म्हणाले. बिलोली इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं लोकार्पण चव्हाण यांच्या हस्ते झालं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image