राज्यात आतापर्यंत ६३ लाख २८ हजार ५६१ रुग्ण कोरोनामुक्त
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख १८ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख २८ हजार ५६१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३८ हजार ४६९ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४७ हजार ९१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ९ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.नांदेड जिल्ह्यात काल ३ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल जिल्ह्यात एकाही नवीन रुग्णाची नोंद नाही. सध्या २९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परभणी जिल्ह्यात काल ३ नवीन रुग्ण आढळले सध्या जिल्ह्यात ११ रुग्ण उपचार घेत आहेत.सिंधुदुर्गात काल १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले काल जिल्ह्यात ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली सध्या जिल्ह्यात १ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.बुलडाणा जिल्ह्यात काल बरे झालेल्या ३ रुग्णांना सुट्टी दिली. काल जिल्ह्यात ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या २८ रुग्ण उपचाराधीन आहेत.वाशीम जिल्ह्यात काल ३ रूग्णांनी कोरोना वर मात केले. काल जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही. सध्या ५ रुग्णांवर उपचार सुरु घेत आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.