बंदमुळे झालेले नुकसान राज्य सरकारकडून भरुन घेण्याची भाजपची मागणी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : आजच्या सरकार-पुरस्कृत बंदची न्यायालयानं दखल घ्यावी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारकडून घ्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. महाविकास आघाडीचा आजचा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस असल्याची टीकाही त्यांनी केली. या बंदला लोकांची साथ मिळाली नसून प्रशासनाची मदत घेऊन धाक-दपटशाहीनं काही ठिकाणी बंद यशस्वी झाल्याचं सांगितलं गेलं असं ते म्हणाले.लखीमपूर इथली घटना गंभीर आहे, पण आजचा बंद ही त्या घटनेबाबत संवेदना नसून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.