अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानापोटी १० हजार कोटींचं अर्थसहाय्य देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर,तर बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचा निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. केंद्र पुरस्कृत अमली पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना राज्यात राबवण्यास देखील मान्यता देण्यात आली. तसंच राज्यातील अकृषी विद्यापीठं आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट - सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देणं आणि कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कलाकारांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णयही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.