अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी - पीयूष गोयल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते काल दुबईत आयोजित इंडियन पीपल्स फोरमच्या व्यापार मेळाव्याला संबोधित करत होते. इतर देशांमधे मोठ्या प्रमाणावर राहणाऱ्या भारतीय समूहाकरता आपल्या मायदेशात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतात होत असलेल्या अभूतपूर्व वाढीत हातभार लावण्याची ही मोठी संधी आहे, असं ते म्हणाले. देशात व्यापारपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत, त्यामुळे अवघ्या पाच वर्षात व्यापार सुलभतेच्या मानांकनात भारतानं १३० व्या स्थानावरुन ६३ व्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातल्या राजनैतिक नात्याला पुढच्या वर्षी ५० वर्ष पूर्ण होतील. दोन्ही देशांमधले संबंध आणखी पुढं नेण्यासाठी ही चांगली संधी आहे, असं ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.