कोरोना संसर्गाविरोधात भारतानं मजबूत लढा दिला - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात भारतानं वेगानं पावलं उचलत मजबूत लढा दिला अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या कोरोना विरोधातल्या लढ्याचं कौतुक केलं आहे. भारतानं अशी रीतीनं लढा दिल्यामुळेच कोरोनामुळे झालेल्या नुकसानीतून भारताला वेगानं उभारी घेण्याची संधी असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. या महामारीच्या काळात भारतानं सर्वाधिक गरजुंना मदत देण्यासह, पतधोरणातली सुलभता, तरलतेसंदर्भातल्या तरतुदी, वित्तीय क्षेत्राची संर्वंकषता, नियमन धोरणं अशा उपाययोजना राबवत संरचनात्मक सुधारणा कायम ठेवल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळानं नुकतीच भारताची अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थितीच्या मूल्यांकनासाठी भारताच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. संसर्गाच्या कठीण काळातही भारतानं कामगार सुधारणा आणि खासगीकरणासारखी धोरणं राबवत संरचनात्मक सुधारणा करणं सुरुच ठेवल्याचं नाणेनिधीनं नमूद केलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.