राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत काल हा आराखडा मंजूर करण्यात आला. हा कृती आराखडा २०२१ ते २०३० असा दहा वर्षांसाठी तयार केला असून असा आराखडा तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मानव व्याघ्र संघर्षावर अभ्यासगटानं सादर केलेल्या अहवालातल्या शिफारशींवर बैठकीत चर्चा झाली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या अंधारी अभयारण्य क्षेत्राचं विस्तारीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.