न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम मध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला. न्युझीलंडनं भारताला सहा गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांच आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतानं शेवटच्या षटकात एक चेंडू शिल्लक ठेवत पार केलं. भारताच्या विजयात सुर्यकुमार यादवनं 62 धावा केल्या आणि कर्णधार रोहित शर्मानं 48 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. न्युझीलंडच्या मार्टीन गुप्टीलनं संघासाठी महत्त्वपूर्ण 70 धावांचं योगदान दिलं. दुसरा सामना रांची इथं उद्या खेळवला जाणार आहे. भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.