देशातल्या विमानतळांची संख्या येत्या ४-५ वर्षात अडीचशेवर जाणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ४-५ वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या २५० पर्यंत जाणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत दिली. उडाण योजनेअंतर्गत केवळ लहान शहरांना हवाई वाहतुकीशी जोडण्यात आलं नाही तर ६३ विमानतळं आणि हेलिपोर्ट्स उभारण्यात आले आहेत. गेल्या सात वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट होऊन १३० झाल्याचं ते म्हणाले. हिंदूस्थान एअरनॉटिक्सनं ३६ आसनी क्षमता असलेल्या ८० विमानांची निर्मिती केल्याचंही लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.