शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या विविध पातळ्यांवर दीर्घकालीन योजना - नरेंद्रसिंह तोमर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं विविध पातळ्यांवर दीर्घकालीन योजना आखल्याचं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत सांगितले. विविध शेतमालासाठी सरकार किमान आधारभूत किमंत जाहीर करत असून, गेल्या २०२०-२१ च्या खरीप हंगामात सरकारनं आधारभूत किमतीने ८९४ लाख टनाहून अधिक धानखरेदी केली. याचा लाभ १३१ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना झाला. २०२१-२२च्या रब्बी हंगामात ४३३ लाख टनाहून अधिक गहू खरेदी झाली असून त्याचा लाभ ४९ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना झाला. सरकारनं ८ लाख ३७ हजार टन डाळी आणि तेलबियांची खरेदी केली असून त्यामुळे ५ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला, अशी माहिती तोमर यांनी लेखी उत्तरात दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.