अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. वाढत्या रुग्णसंख्येवर आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली असून कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर दुप्पट झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. गर्दी कमी करणं, संसर्ग टाळणं, मुखपट्टी वापरणं हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यानं विद्यालयांबरोबर आता मुंबईतल्या महाविद्यालयं देखील येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या लॉकडाऊनचा विचार नसून कडक निर्बंध कडक लागू केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बाधित रुग्णांचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला असून घरगुती विलगीकरणासाठी प्रशासनानं नव्यानं मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.