वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्यानं महावितरण आर्थिक संकटात
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्यानं महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकानं देयकांची थकबाकी भरून महातिवरणला सहकार्य करावं, असं आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे. ते काल बुलढाणा जिल्ह्यात खामगांव इथं एका कार्यक्रमात बोलत होते.
महावितरणला देखील बाहेरून, पैसे देऊन वीज खरेदी करावी लागते, असं त्यांनी सांगितलं. महापारेषणच्या धरणगाव वीज उपकेंद्राचं लोकार्पण आणि मनसगाव इथल्या वीज उपकेंद्राचं भूमीपूजन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, आमदार राजेश एकडे, माजी आमदार दिलीप सानंदा, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.