भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी - केंद्रीय आरोग्यमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत ही जगासाठी औषध निर्मितीची राजधानी ठरली आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयडीएमए अर्थात भारतीय औषध निर्माण उद्योग संघटनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उद्धाटनसमारंभात बोलत होते. सध्याचं सरकार गरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं असतानाच उद्योगस्नेही देखील आहे, असं ते म्हणाले. देशाच्या विकासात उद्योगांची भूमिका महत्वाची असते, देशाला स्वंयपूर्ण करण्यातही उद्योग महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यात औषधनिर्मिती उद्योग आघाडीवर आहे, असं त्यांनी सांगितल.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image