दर्जेदार औषध निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं औषध उद्योगाला आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषध निर्मिती क्षेत्राला दर्जेदार औषधं निर्माण करण्याचं आणि जागतिक बाजारातला त्यांचा वाटा वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय औषध निर्मिती किंमत निर्धारण प्रधिकरणाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. जगात दर्जेदार औषध निर्मिती करणारा देश म्हणून भारताची प्रतिष्ठी वाढलेली असून औषधं निर्मिती कंपन्यांनी या क्षेत्रात आता संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. भारतीय आरोग्य उद्योगानं जागतिक बाजाराचा विश्वास संपादन केला असून आता भारत जगाच्या औषधं निर्मितीचं केंद्र झाला आहे असंही ते म्हणाले. औषधांच्या निर्यातीत वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image