चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशिया क्षेत्रातल्या देशांशी व्यापार वृद्धीच्या संधी खुल्या करण्याच्या दिशेनं भारत काम करत आहे - सर्बानंद सोनोवाल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चाबहार बंदराच्या माध्यमातून मध्य आशिया क्षेत्रातल्या देशांशी व्यापार वृद्धीच्या संधी खुल्या करण्याच्या दिशेनं भारत काम करत असल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित चाबहार परिषदेला संबोधित करत होते.
चाबहार हे बंदर म्हणजे प्रगत मध्य आशिया क्षेत्राला दक्षिण आशियाच्या बाजारपेठेशी जोडणारा दुवा असून हे बंदर व्यापार आणि आर्थिक सहयोग वाढवणारं बंदर म्हणून उदयाला आलं असल्याचं सोनोवाल म्हणाले.
हे बंदर दोन भूभागांशी केवळ संपर्कच प्रस्थापित करणार नसून गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासह ते सांस्कृतिक आणि राजकीय संबंधांना बळकटी आणणार असल्याचंही सोनोवाल म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.