एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं सात गड्यांच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या. एडन मरक्रम ७९ आणि रिझा हेंड्रिक्सनं ७४ धावा केल्या. भारताच्या मोहम्मद सिराजनं तीन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदर, शहाबाद अहमद, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने हे आव्हान तीन गड्यांच्या मोबदल्यात केवळ २५ षटक आणि पाच चेंडूत पूर्ण केलं. श्रेयश अय्यरनं नाबाद ११३ आणि ईशान किशन ९३ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या मालिकेतला शेवटचा सामना उद्या दिल्ली इथं अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.