शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष - डॉ.एस.जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.

चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते. सध्याचा पेचप्रसंग हा उभय देशांना हितावह नाही यावर त्यांनी भर दिला.

दूरदर्शी उपाय आणि त्यासाठी हवी असलेली इच्छाशक्ती दोन्ही देशांनी दाखवणं गरजेचं आहे. गेली काही वर्ष दोन्ही देशांमधले संबंध आणि उपखंडातल्या संभावना या दोन्हींसाठी आव्हानात्मक होते, असंही जयशंकर म्हणाले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image