दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रणनिती आणखी विकसित करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रणनिती आणखी विकसीत करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं इंटरपोलच्या ९० व्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना बोलत होते. त्यासाठी भारत संवर्धित जागतिक सहकार्याचं आवाहन करत आहे. असं ते म्हणाले.
आपत्तीच्या काळात भारत इतरांच्या मदतीसाठी सर्वात पुढं असतो. संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत भारतानं महत्तवाची भूमिका बजावली आहे, असं त्यांनी सांगितलं. भारतानं जोपासलेली नीतीमूल्यं इंटरपोलच्या संकल्पनेत आढळतात. जगभरातले पोलीस समाजाच्या कल्याणाची धुरा पुढं नेत आहेत, असं ते म्हणाले. कोरोना काळात पोलीसांनी बजावलेल्या भूमिकेची मोदी यांनी यावेळी प्रशंसा केली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.