ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना केली सुरू

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना सुरू केली आहे. ज्या राज्यांना ऊर्जेची टंचाई जाणवत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल, असं या मंत्रालयानं सांगितलं. बिजली वित्त निगम कंसल्टिंग लिमिटेड त्यासाठी नोडल एजंसी म्हणून काम करेल. या कंपनीनं या योजनेसाठी निविदा मागवल्या आहेत. हा पुरवठी पुढच्या वर्षी एप्रिलपासून सुरू होईल. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडनं या योजनेत सारस्य दाखवलं आहे. येत्या २१ डिसेंबरपर्यंत या निविदा दाखल करायच्या आहेत. पहिल्यांदाच शक्ती योजनेअंतर्गत अशा बोली लावल्या जात आहेत. देशात कोयला उत्पादन वाढीसाठी २०१८ मध्ये शक्ती योजना सुरू झाली. कोळशाच्या कमी पुरवठ्यामुळे संकटात सापडलेल्या वीज कंपन्यांना कोळसा पुरवणे हा त्यामागचा हेतू आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image