जल जीवन अभियानानं ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): ग्रामीण भागात घरोघरी नळानं पाणीपुरवठा करण्याच्या जल जीवन अभियानाने ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबद्दल सर्व संबंधितांचं अभिनंदन केलं आहे. १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रधानमंत्र्यांनी या अभियानाची घोषणा केली होती. २०२४ पर्यंत देशातल्या सर्व घरांमधे नळानं पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचं मोहिमेचं उद्दिष्ट आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.