हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरुच आहे. आज गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पिक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मागील चार दिवसांपासून गोरेगाव इथं बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी उद्या गोरेगावसह हिंगोली आणि सेनगाव इथल्या बाजारपेठ बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.