देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१८-१९ मधे केवळ २ लाख ३२ हजार व्यवहार डिजिटल पद्धतीने झाले होते. ती संख्या २०२१ - २२ मधे ७ लाखाच्या वर गेली देशभरात ८४ डिजिटल बँकशाखा सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या बँका २४ तास चालू असल्याने ग्राहकांना मोठी सुविधा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.