शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची राज्य सरकारची विधानसभेत ग्वाही
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या शैक्षणिक वर्षाच्या आधी राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. हा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता. ही भरती प्रक्रिया खासगी आणि सरकारी अशा सर्व शाळांसाठी केली जात असून त्यासाठी दोन स्वतंत्र कंपन्या नेमण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली. कोकणात ओढ्या, नाल्यांवरचे साकव एकाच वेळी नव्यानं बांधून काढण्यासाठी केंद्राकडून सोळाशे कोटींचा निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात काँक्रिटचे छोटे पूल बांधले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पूर्वी हे साकव जिल्हा परिषदेमार्फत बांधले आणि दुरुस्त केले जात असत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.