भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शहर नियोजन, विकास आणि स्वच्छता या विषयावरच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारला ते आज संबोधित करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शहर नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं ते म्हणाले. वाहतूक तसंच पायाभूत सुविधांचं नियोजन आणि जलव्यवस्थापन ही महत्त्वाची क्षेत्रं असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. शहराच्या विकासाबरोबरच मानवकेंद्री विकासही सुनिश्चित केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image