राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाचा ४९ विद्यापीठांशी करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानानं युवकांना जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनासाठी प्रेरित करण्यासाठी ४९ विद्यापीठांशी करार केला आहे. नद्यांची शाश्वत परिसंस्था निर्माण करण्याच्या जनचळवळीत विद्यार्थी समुदायाला आघाडीवर आणणं हा या कराराचा उद्देश आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासह गंगा नदीची स्वच्छता आणि शुद्धता सुनिश्चित करणं हे नमामि गंगे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी यावेळी सांगितलं. जीवन जगण्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यापीठांमध्ये वादविवाद आणि इतर स्पर्धा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image