प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची दिली कबुली
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची कबुली दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्री म्हणाले की, उच्च-गुणवत्तेची आणि स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचं हे यशस्वी उदाहरण आहे. निरोगी भारतासाठी आरोग्य विभाग परिणामकारक योगदान देत असल्यानं लोकांना मदत होत आहे. दुसर्या ट्विटमध्ये, मोदींनी केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी, रेल्वे स्थानकावर पारंपारिक लोकसंगीतानं दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी त्रिशूरच्या लोकांचं कौतुक केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.