बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं - माजी मुख्यमंत्री
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं. ती अंतिम भूमिका नव्हती असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. तेल शुद्धीकरण प्रस्तावित असलेल्या सोलगावला त्यांनी भेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ते वार्ताहरांना संबोधित करत होते. स्थानिकांच्या सहमतीशिवाय हा प्रकल्प होऊ नये. सरकारनं प्रकल्पासाठी स्थानिकांशी चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.