नवी दिल्ली(वृत्तसंस्था): बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध पौर्णिमा हा, ज्यांनी मानवतेला विचार आणि कृतीत अभिजाततेकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं, त्या गौतम बुद्धांच्या गहन शिकवणींवर चिंतन करण्याचा दिवस आहे, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
गौतम बुद्धांचा अहिंसा, सहिष्णुता आणि शांतीचा संदेश शतकानुशतके प्रतिध्वनीत होत असून, आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असल्याच त्यांनी म्हटलंय. या मंगल प्रसंगी आपण भगवान बुद्धांच्या धम्माच्या तत्त्वांनुसार स्वतःला समर्पित करूया आणि सर्व प्राणिमात्रांप्रती करुणा आणि दयाळूपणा या गुणांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करूया असं धनखड यांनी म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.