बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई-प्रणाली संचाचं उद्घाटन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई-प्रणाली संचाचं उद्घाटन काल केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते झालं. दादर इथल्या स्वामी नारायण मंदिर योगी सभागृह इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. देशात ५ कोटी खटले प्रलंबित असून, या खटल्यांना दिरंगाई होत आहे. अजून प्रलंबित खटले वाढत आहेत. आता ई फाईलिंगद्वारे कामे जलद होतील असं यावेळी किरेन रिजीजू यांनी यावेळी म्हटलं.
२०१४ नंतर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात सरकारनं क्रांतिकारी पाऊले उचलली आहेत. १९४७ पासूनचे जुने कायदे काढून टाकण्यात आले आहेत, अजून काही कायदे हटवण्याचं काम सुरू आहे असही त्यांनी यावेळी सांगितलं . विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आवश्यक आहे.आपली कामे जलद गतीनं करायची असतील, तर असे निर्णय घेणं आवश्यक आहे. ठाण्यात जी जागा प्रस्तावित जागा आहे, ती सरकार नक्की देईल. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं ही जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यतले अनेक मंत्री आणि खासदार उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.