बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात चक्रीवादळ निर्माण होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): बंगालच्या उपसागरात भारताच्या आग्नेय तटावर येत्या दोन दिवसात कमी दाबाचा पटटा आणि त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे भारताच्या पूर्व भागातील राज्यात सागरी किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात अंदमान आणि निकोबार बेटावर तुरळक ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसच बंगालच्या उपसागरात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने छोटी जहाजे तसच मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.