प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचण्याचा, असमानता दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून, प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचत, असमानता दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील गांधीनगर इथं केलं. गांधीनगरमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते.
अनेक दशकांपासून विविध निवास योजना असूनही, अदयाप 75 टक्के लोकसंख्येसाठी योग्य शौचालयांची उपलब्धता नाही. घर हे केवळ निवारा नसून ते विश्वासाचे ठिकाण आहे, जिथं स्वप्ने साकार होतात आणि नव्या शक्यतांचा जन्म होतो, असंही प्रधानमंत्री म्हणाले. आपलं सरकार लाभ देताना धर्म किंवा जात पाहत नाही आणि हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे. सरकारनं गरिबीविरुद्धच्या लढाईसाठी मजबूत आधार देणारी घरं निर्माण केली आहेत, ते सशक्तीकरण आणि सन्मानाचं साधन आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.