५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ बाजारातले दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचीव संजीव चोप्रा यांनी नवी दिल्ली इथं बातमिदारांना ही माहिती दिली. केंद्र सरकारला मिळालेल्या माहितीनुसार, गहू आणि तांदळाचे दर वाढवण्यासाठी काही व्यापारी  गहू आणि तांदळाचा अवैधरित्या साठा करत आहेत. मात्र देशात गहू आणि तांदळाचा पुरेसा साठा आहे, असंही चोप्रा यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image